भारत सरकारने E22, E25, E27 आणि E30 या उच्च इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील संपूर्ण केंद्रीय उत्पादन शुल्क माफ केले आहे. आखाती देशांमधील तणावामुले आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. त्याचा फटका भारताला सुद्धा बसला आहे.त्यामुळे इंधन बचतीसाठी वेगवेगळे उपाय योजना राबवण्यात येत आहेत.
वित्त मंत्रालयाने २२ ते ३० टक्के इथेनॉल मिश्रण असलेल्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे.
या निर्णयामुळे इथेनॉल मिश्रित इंधनाला मोठी चालना मिळणार असून, भारताची आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल.
तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी आणि पर्यावरणपूरक अर्थव्यवस्था उभारण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.





